

Nomadic Tribes in Maharashtra Remain Outside Mainstream Development as Documents and Delayed Schemes Block Their Benefits
sakal
अहिल्यानगर: दरवर्षी ३१ आॅगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटली, तरीही हा समाज अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. राज्यातील लाखो भटके विमुक्त बांधव हे शासन व प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे विविध योजनांपासून वंचित आहेत. आधुनिकीकरणामुळे त्यांचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रोजगार शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.