

MLA Sangram Jagtap
Sakal
अहिल्यानगर:‘‘अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी होणे, हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. या पुतळ्याबरोबरच शहरात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीचे काम झाले. आता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम लवकरच सुरू करू. पुतळे प्रेरणा देणारे व शहराची ओळख निर्माण करणारी स्मारके आहेत. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भरच पडली आहे,’’ असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.