rahul gandhi and rama jhavare
sakal
- समीर दाणी
अहिल्यानगर - पुणे शहरात शनिवारी (ता. २३) झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. मंचावर बोलण्याची पहिली संधी अहिल्यानगरच्या ॲड. रमा झावरे यांना मिळाली. यावेळी त्यांनी ‘‘मला कुणा पुरुषाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही’, असे परखड मत मांडले.