
अकोले : "विकेल ते पिकेल' अभियानात मेहदुरी येथील विकास देवराम आरोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सवांद साधला.
आरोटे म्हणाले, की आमच्या अगस्ती कंपनीने आसाममधून 5 किलो निळ्या भाताचे बियाणे आणले. तेथील कृषी अधिकाऱ्यांचे पथक भेटीसाठी आले होते.
अगस्ती फार्मर्स कंपनी व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली निळ्या भाताची लागवड केली. त्यातून 120 किलो बियाणे तयार झाले. या बियाण्याचा तालुक्यात प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी शिरपुंजे, धामणवन, सावरकुटे आणि माणिक ओझर येथील शेतकऱ्यांना सहा एकरांवर लागवड केली जाणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की अकोल्याचा शेतकऱ्याची ही संकल्पना चांगली असून, त्याचे कौतुक करणे आवश्यक आहे. या तांदळाला हमी नव्हे, तर हमखास भाव मिळाला पाहिजे, हे आमचे धोरण आहे. कृषी विभागाने संशोधन व मार्केटिंग करून शेतकऱ्यांना विकेल ते पिकेल ही योजना राबवून नावाला साजेसे काम करावे.
आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक शिवाजी जगताप, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, बाळनाथ सोनवणे, अनिता आरोटे, नवनाथ आरोटे आदी उपस्थित होते.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.