

अहिल्यानगर : समाजाच्या सर्वच स्तरातील घटकाच्या कल्याणाची, त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी प्रशासकीय सेवेतून मिळत असते. याच मिळालेल्या संधीतून गेल्या दोन वर्षांत विकासकामांतून जिल्ह्याच्या वाढलेल्या लौकिकात सर्व विभागांचे सहकार्य मोलाचे ठरले. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य तसेच जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी काढले.