Ahilyanagar : जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची लाट; जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात १७ ते २० एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना उष्मा लाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशु-प्राणी यांचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
Citizens cover up and stay indoors as the district battles an intense 3-day heatwave.
Citizens cover up and stay indoors as the district battles an intense 3-day heatwave.Sakal
Updated on

अहिल्यानगर : जिल्ह्यात आगामी तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. हवामान खात्याने जिल्ह्यासाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com