

Major Boost to Rural Education: 200 Students Get Educational Guardianship
sakal
अहिल्यानगर : दुष्काळग्रस्त, भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. त्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट राहू नये, हा यामागे उद्देश आहे. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा अहिल्यानगर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.