Sangamner : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा शेतमाल रोखणार; शेतकरी संघटनांनी साधला डॉ. आंबेडकर जयंतीचा मुहूर्त

Ahilyanagar News : गेल्या १५ वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर बँकांची थकीत कर्जे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६-१७च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सहा हजार शेतकऱ्यांना पात्र असूनही वंचित ठेवले.
Farmer unions rally on Ambedkar Jayanti demanding debt relief and threatening crop supply disruption.
Farmer unions rally on Ambedkar Jayanti demanding debt relief and threatening crop supply disruption.Sakal
Updated on

श्रीरामपूर: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेल्या सर्व वित्तीय संस्थांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे; अन्यथा शेतकरी आपला कांदा, दूध इतर भाजीपाल्यासह कोणतेही अन्नपदार्थ शहराकडे जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी दिला, तसेच दुसरीकडे स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीतर्फे राज्यभरात महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी आंदोलनाचा इशारा दिला असून, सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा १४ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com