शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही

Farmers have not yet received compensation
Farmers have not yet received compensation

संगमनेर ः ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे सर्व हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा देत, तातडीने नुकसानीची पाहणी व पंचनामे करूनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. शेतमालाची विक्री करता न आल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत, शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, अपार कष्ट घेत पिके उभारली. मात्र, त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली.

अतिवृष्टीमुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्षे, डाळिंबासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अकस्मात संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी व महसूल विभागासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. 

संबंधित विभाग व प्रशासनाने वस्तूनिष्ठ पंचनामेही केले. शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, दिवाळी होऊन महिना झाला, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही पदरात न पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com