Ahilyanagar Accident: 'गळ्याला केबल अडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू'; महामार्गावर तुटलेली केबलने केला घात, काम आवरलं अन्..

Incomplete roadwork turns fatal for biker: रात्री ११ वाजता ज्ञानेश्वर कामावरून सुटल्यावर दोघेही कंपनीतून दुचाकीवर गावाकडे जाण्यासाठी निघाले. दुचाकी ज्ञानेश्वर चालवत होता. शुभम पाठीमागे बसलेला होता. मनमाड रोडने नगरकडे येत असताना सावेडी परिसरातील कीर्ती हॉटेलजवळ रस्त्याच्या वरून जाणारी काळी केबल तुटून खाली लोंबकळत होती.
Ahilyanagar Accident
Ahilyanagar AccidentSakal
Updated on

अहिल्यानगर: महामार्गावर तुटलेली केबल न दिसल्याने दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली. दुचाकी घसरून तो खाली पडला. त्याचे डोके पथदिव्याच्या लोखंडी खांबाला आदळून गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर - मनमाड महामार्गावर सावेडी परिसरातील कीर्ती हॉटेलसमोर घडली. ज्ञानेश्वर अंबादास बांगर (वय २७, रा. कारखेल, ता. आष्टी, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com