राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सोमवारी (ता. 15) सोडण्यात येणार आहे. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाल्या, मुळा धरणातून उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी उजव्या कालव्याद्वारे दोन आवर्तने व डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. उजव्या कालव्याद्वारे 15 मार्चपासून आवर्तने सुरू होतील. डावा कालवा नगर पाटबंधारे विभागाच्या आधिपत्याखाली आहे. डाव्या कालव्याचे आवर्तन बुधवारी (ता. 10) सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु तशी मागणी नगर पाटबंधारे विभागाकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे डाव्या कालव्याच्या आवर्तनाची तारीख अद्याप अस्पष्ट आहे.
नगर शहर होणार पंचतारांकीत, महापालिकेची फुल्ल तयारी
दरम्यान, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.