

Damaged car and truck after a fatal collision on the Shrirampur–Sangamner road in Ahmednagar district.
sakal
श्रीरामपूर: तालुक्यातील खंडाळा येथे गणपती दर्शनासाठी निघालेल्या चव्हाण कुटुंबाच्या आनंदावर काळाने विरजण घातले. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील एस.टी. कार्यशाळेजवळ बुधवारी (ता.२५) दुपारच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शहरातील प्रसिद्ध ‘संतोषी वडापाव’चे संचालक अशोक व रमेश चव्हाण यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन चिमुरड्यांसह एका महिलेची मृत्यूशी झुंज सुरू आहे.