नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवसाला 20 ते 25 जणांचा लॉट येत असल्याने नगरकरांची झोप उडाली आहे, तर प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या कमालीची वाढत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे.
हेही वाचा ः थुंकी पडली साडेतेरा लाखांना !
आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालातून चांगल्याच समाचाराची बातमी आली. ती म्हणजे नगर जिल्ह्यातील आठ रुग्णांची कोरोनावर मात मिळवली. त्यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यात नगर शहर चार, श्रीगोंदे तीन आणि कोपरगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांची असलेली अहोरात्र सेवा फळाली आली आहे. जिल्ह्यात सुमारे महसूल, आरोग्य, पोलिस आदी साडेनऊ हजार कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जरी 422 झाली असली, तरी जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल 291 म्हणजेच तीनशेच्या घरात पोचली आहे. ही नगरकरांसाठी खुशखबर आहे. आता सध्या 117 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, आज सकाळीच 65 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.