
-अरुण नवथर
अहिल्यानगर : अपघातांच्या घटनांमध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. येथील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. वर्षभरात जिल्ह्यातील महामार्गांवर एक हजार ३२५ अपघात झाले असून, त्यात साडेनऊशेहून अधिक व्यक्तींचा जीव गेला. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांकडे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने दुर्लक्ष केले आहे. ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखली जाणारी ४३ धोकादायक वळणे देखील अद्याप अविकसितच आहेत. त्यामुळे अपघातांचे हे सत्र थांबणार कधी? असा संतप्त सवाल प्रवाशांसह विविध सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.