

Legal Setback for Government: HC Notice in Loan Waiver Contempt Case
sakal
श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या नवीन अवमान याचिकेची दखल घेत, खंडपीठाने संबंधित सचिव व अधिकाऱ्यांना नोटीस बजावत १२ मार्च २०२६ पर्यंत स्पष्टीकरण मागविले आहे.