
कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या ठिकाणांहून इतिहास घडवला, अशा १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची ऐतिहासिक घोषणा म्हणजे महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण आहे. या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला.