MLA Ashutosh Kale Calls for Irrigation Water for Kharif CultivationSakal
अहिल्यानगर
Ashutosh Kale : कालव्यातून ‘ओव्हर फ्लो’चे पाणी सोडा :आमदार आशुतोष काळे; खरीप पिकांना पाण्याची गरज
Release Overflow Water from Canal for Kharif Crops: उगवण चांगली झाली; मात्र जून महिना संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी पावसाचा पत्ता नाही. विहिरी अद्याप कोरड्या आहेत. पुढील काळात पावसाने अशीच उघडीप दिली, तर खरीप बारमाही पिकांना मोठा फटका बसेल. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल.
कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत; परंतु जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले. खरीप पिकांना पाण्याची गरज निर्माण झाल्याने गोदावरी कालव्यांतून तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

