
सोनई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीनिमित्त निर्मलवारी उपक्रमांतर्गत पुण्यातील समन्वयक संदीप जाधव यांच्या माध्यमातून नेवासे येथून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यातील वारकरी व रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करीत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण म्हणून तीस हजार रेनकोटचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छांचा निरोप ऐकून व त्यांनी पाठविलेले मायेचे पांघरूण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद देणारे ठरले.