

Manoj Jarange Issues Strong Statement Over Possible Maratha Movement
Sakal
शिर्डी: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल, असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे. मराठवाड्यासाठी, तर जीआर देखील निघाला आहे. मात्र, आंदोलन करण्याची वेळ आली, तर सरकारचे अवघड होईल. मला समाजापेक्षा कुणीच मोठे नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला.