श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील कारेगाव, भेर्डापूर आणि टाकळीभान येथील ग्रामपंचायतींच्या निकालांबाबत हरकती घेण्यात आल्या आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
कारेगाव, भेर्डापूर व टाकळीभान येथे मतदानावेळी आमच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम यंत्रावर वेळोवेळी हरकती घेतल्या; परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यास दाद दिली नाही. ईव्हीएमवर हरकती नोंदविण्याचा अधिकार प्राथमिक कक्षेत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक निकालानंतर फेरमतमोजणीची मागणी करीत असून, ईव्हीएममध्ये व्हीव्ही पॅट प्रणाली उपलब्ध नाही.
मतदान होण्याआधी व निकाल मिळेपर्यंतच्या काळात हे उपकरण हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी तांत्रिक प्रयोगशाळेत मतदान यंत्र तपासाचा अहवाल मिळेपर्यंत निकालास स्थगिती देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब पटारे यांच्यासमवेत विविध उमेदवारांनी सह्या केल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.