राहुरी : ग्रीनफिल्ड महामार्गातील भूसंपादनाबाबत तनपुरे यांना निवेदन

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
भूसंपादनाबाबत तनपुरे यांना निवेदन
भूसंपादनाबाबत तनपुरे यांना निवेदन Sakal

राहुरी : सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गातील भूसंपादनाबाबत राहुरी शहरातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. मंत्री तनपुरे यांनी "आपण शेतकऱ्यांच्या बरोबर असून योग्य तो मोबदला देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीन." असे शेतकऱ्यांना आश्वासित केले .

आज (शनिवारी) सकाळी मंत्री तनपुरे यांच्या निवासस्थानी राहुरी शहरातील प्रकल्पबाधित शेतकरी गंगाधर सांगळे, अविनाश तोडमल, बापूसाहेब वराळे, प्रसाद मैड, जबिर शेख, नंदू वराळे, कृष्णा मैड, देवराव येवले, अशोक तोडमल आदी शेतकऱ्यांनी मंत्री तनपुरे यांना निवेदन दिले. या महामार्गामध्ये राहुरी नगरपालिका हद्दीतील शहराच्या पश्चिमेकडील सुमारे ३६ गट व सर्वे मधून हा मार्ग जाणार आहे. शहरातील ५  किलोमीटर अंतर हायवेमध्ये असणार आहे . तालुक्यातील १९ गावातून ४४ किलोमीटर मधील ४२८ हेक्टर शेतजमीन यात जात आहे.

भूसंपादनाबाबत तनपुरे यांना निवेदन
Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

कैफियत मांडताना शेतकरी म्हणाले, "राहुरी शहरातील मोठा बागायत भाग यात जाणार आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. हायवेलगत सर्व्हिस रोडही निश्चित नाही. ओढे, नाले व पावसाचे पाणी साचून शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. मागील काही वर्षात या भागातील क्वचितच जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार झाल्याने हा दर गृहीत न धरता सध्याच्या जमिनींच्या बाजारभावाच्या दराप्रमाणे मोबदला गृहीत धरावा."

"बागायती व शहरी भाग असल्याने बाजारमूल्य अधिक आहे , ज्यांचे मोठे शेत्र जाणार आहे. पूर्ण चर्चा करूनच निर्णय घ्यावा. आत्तापर्यंत सर्व संपादित केलेल्या जमीनींना गुणक २ वापरण्यात आलेला आहे. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग व नगर-सोलापूर महामार्ग हे दोन्ही महामार्ग अहमदनगर जिल्हयातून जात आहेत. या दोन्ही महामार्ग महामार्गा करिता संपादीत करण्यात आलेल्या जमिनींना गुणक 2 प्रमाणे वापर झालेला आहे. सुरत-हैदराबाद महामार्गाला या दोन महामार्गांप्रमाणे गुणक २ वापरावा." अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

भूसंपादनाबाबत तनपुरे यांना निवेदन
नवा व्हेरियंट, कृषी कायदे! PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

मंत्री तनपुरे म्हणाले, "गुणक दोन चा नियम या रस्त्याला लागू आहे. ज्या शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र जात आहे. त्याना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्याय दिला जाईल. राहुरी तालुक्यातील सर्वाधिक गावे या हायवेत जाणार असल्याने आपण या जातीने लक्ष घालून प्रकल्प अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा सखोल चर्चा करू." असे आश्वासित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com