

अहिल्यानगर: आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे मातंग व बौद्ध समाजात तेढ निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. मात्र, बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे मातंग समाजानेही शिक्षणाची कास धरावी. सरकारनेही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा करावा, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आठवले यांनी सामाजिक न्याय विभागातील योजनांचा आढावा शासकीय विश्रामगृहावर घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.