

Sadabhau Khot Criticizes Free Grain Policy Says India Needs Jobs Not Subsidies for Sustainable Growth
sakal
अहिल्यानगर: शासनाच्या अनेक योजनांना कुठे तरी कात्री लावणे गरजेचे आहे आणि हाताला काम देणारी योजना आणावी लागणार आहे. फुकट धान्य द्यायचं, अनुदान द्यायचं हे थांबवणं आवश्यक आहे. आमची मुलं इंजिनिअरिंग झाली आहेत, त्यांना उद्योग सुरू करायचा आहे. मात्र, बॅंका त्यांना तारण मागतात. ते कुठून आणणार आहेत. त्यांच्याकडे डिग्री आहे.