
संगमनेर : राज्यातील सर्व शाळांमध्ये आता केंद्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर आधारित ‘एनसीईआरटी’चा अभ्यासक्रम लागू होणार असल्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ ६८ शब्दांत उल्लेख असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गंभीर बाब आमदार सत्यजित तांबे यांनी विधानसभेत उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली.