नगर तालुका ः ग्रामपंचाय निवडणूक प्रक्रियेस आज ( ता. 23 ) पासून प्रत्यक्ष सुरवात झाली. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पूर्वी सरपंच पदासाठीचा उमेदवार हा किमान सातवी पास असावा असा होता. त्यात आता अंशतः बदल करून ग्रामपंचायत सदस्यत्वाची निवडणूक लढणारा सदस्य हा सातवी पास असावा. उमेदवारी अर्जासमवेत उमेदवारास आपण किमान सातवी पास असल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून अंगठेबहाद्दर हद्दपार होणार आहेत.
ज्या व्यक्तीची जन्मतारीख 1 जानेवारी 1995 नंतरची आहे अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्जा सोबत आपला सातवी पासचा शाळेचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. ज्यांची जन्मतारीख 1995 च्या आधीची आहे अशा ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना या प्रक्रियेतून सूट मिळणार आहे.
आज नगर तालुक्ययातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेची सुरवात मध्यवर्ती शासकीय इमारतीतील तहसील कार्यालयात करण्यात आली. या वेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराचा किमान सातवी पास असल्याचा दाखला जोडलेला असावा असा आदेश दिला आहे. अहमदनगर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.