
श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे गटाच्या समर्थक संचालकांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विखे गटाचे सात, मुरकुटे व ससाणे गटाचा प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ संचालकांनी आपल्या संचालकपदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे दिले आहेत. यासाठी बाजार समितीचा कारभार चांगला चालत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आले असून, लवकरच प्रशासकांची नियुक्ती होईल, असे भाकित वर्तविले जात आहे.