राज्य सरकारने "निळवंडे"साठी पहिल्यांदाच हात सोडला ढिला!

https://www.esakal.com/ahmednagar/possibility-closure-covid-test-laboratory-417340
https://www.esakal.com/ahmednagar/possibility-closure-covid-test-laboratory-417340

शिर्डी : ः उत्तर नगर जिल्ह्याच्या सुमारे सव्वा लाख एकर दुष्काळी टापूला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम रखडले आहे. त्याच्या एस्टीमेटमध्येही दरवर्षी वाढ होते आहे. यंदा राज्य सरकारने अर्थसंकल्पात हात ढिला सोडला आहे.

तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली. लाभक्षेत्रात ही बातमी समजताच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 
"सकाळ'शी बोलताना निळवंडे प्रकल्पाचे अभियंता प्रमोद माने म्हणाले, ""पुढील वर्षीच्या जूनपर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जलसंपदा विभागाने ठेवले होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या होत्या. यंदा 365 कोटींची भरीव तरतूद झाली. त्यामुळे कालव्यांची कामे आता वेगाने सुरू होतील. पुढील वर्षी एवढीच तरतूद अपेक्षित आहे. पुढील वर्षभरात लाभक्षेत्रात धरणाचे पाणी नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.'' 

निळवंडे कृतिसमितीचे सुखलाल गांगवे म्हणाले, ""जलसंपदामंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी प्रकल्पाला भेट दिली. कालव्यांच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी निळवंडे कृतिसमितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. "कालव्यांसाठी भरीव निधीची तरतूद करावी. 50 वर्षे वाट पाहिली, आता तरी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पुढाकार घ्या,' अशी विनंती केली. त्यावेळी पाटील यांनी दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले. महाविकास आघाडीने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. शिवाय, या महिनाअखेरीस शंभर कोटींची आणखी तरतूद झाली. एका अर्थाने 465 कोटींची तरतूद झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. निळवंडे कृतिसमितीचा 20 वर्षांचा लढा व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांना राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.'' 
 

निळवंडे प्रकल्पासाठी अपेक्षेहून अधिक निधीची तरतूद झाल्याने, आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता निळवंडे धरणात साठणाऱ्या 11 टीएमसी पाण्याने आमच्या काळ्या आईची कूस उजवेल. आमच्या दोन-तीन पिढ्या दुष्काळाचे चटके सोसत आणि पाण्याची वाट पाहत संपल्या. आमच्या हयातीत आमची पडीक शेती हिरवीगार होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. महाविकास आघाडी सरकारमुळे 50 वर्षांनंतर हा सोन्याचा दिवस उगवला आहे. 
- नानासाहेब शेळके, अध्यक्ष, निळवंडे कृतिसमिती 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com