Wreckage of huts in tribal settlement after a violent storm — the homes built with hardship now reduced to debris.
Wreckage of huts in tribal settlement after a violent storm — the homes built with hardship now reduced to debris.Sakal

Ahilyanagar: 'वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात..

ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले असून यामुळे शेतमाल, घरबांधणी आणि जनावरांचे देखील मोठे नुकसान होत आहे. पाबळपठार परिसर हा डोंगर उतारावरील अतिदुर्गम भाग असून येथे वास्तव्यास असलेली आदिवासी कुटुंबे मजुरीवर उपजीविका करत आहेत.
Published on

संगमनेर : संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला असून वनकुटे (ता. संगमनेर) येथील पाबळपठार भागात वादळाने अक्षरशः थैमान घातले. जोरदार वाऱ्यामुळे १२ आदिवासी कुटुंबांची घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्यही पूर्णतः नष्ट झाले आहे. या घटनेत एकूण १० लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com