अहिल्यानगर जिल्हा हादरला! 'चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले; जामखेड तालुक्यातील घटना, वेगळचं कारण आलं समाेर..

Heartbreaking Case: दोन-तीन वर्षांनंतर रूपालीस सासरच्या लोकांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली. मागील दोन वर्षांपूर्वी रूपालीची सासू मयत झाल्यानंतर तिच्या घरातील कामे करण्यावरून, विहीर खोदण्यासाठी, घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तिचा छळ होत होता.
Tragic scene in Jamkhed, Ahilyanagar, where a married woman and her child were found dead in a well.
Tragic scene in Jamkhed, Ahilyanagar, where a married woman and her child were found dead in a well.Sakal
Updated on

खर्डा: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com