
शिर्डी : ""महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांत मोठ्या प्रमाणात असलेली अस्वस्थता बाहेर येऊ नये म्हणून सरकारने दोन दिवसांच्या अधिवेशनाचा घाट घातला. सरकार नावाची कोणतीच व्यवस्था राज्यात नाही. महाविकास आघाडी सरकार म्हणजे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे,'' अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी येथे माध्यमांशी विखे पाटील यांनी संवाद साधला. कोविड चाचणी करूनच अधिवेशनाला जात असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, ""कोरोनाच्या संकटात सरकार फक्त अधिकाऱ्यांच्या भरवशावर राहिले.
जम्बो हॉस्पिटलच्या घोषणा केल्या; प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा कोविड रुग्णालयांत नाहीत.'' शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत विखे पाटील म्हणाले, ""जिवावर उदार होऊन रात्रंदिवस नर्सिंग स्टाफ काम करीत आहे. मात्र, त्यांना कोणतेही संरक्षण नाही. उलट, त्यांच्या वेतनात कपात करण्याचे निर्णय होतात. व्यवस्थेचे हे दुर्दैव आहे.
जिल्ह्यातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. तीन-तीन मंत्री संस्थानिक असताना एकानेही कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या सरकारच्या केवळ घोषणा आहेत. अधिवेशनाचा कालावधी कमी असला, तरी विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे.''
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.