Rotation for Agriculture : निळवंडेतून शेतीसाठी आवर्तन सुटलेच; नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता

Ahilyanagar News : लाभक्षेत्रातील टंचाई कमी करण्यासाठी भंडारदरा वीज निर्मितीसाठी ८३० क्युसेकने आणि निळवंडे धरणातून १७०० क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी काहीसा दिलासा मिळणार आहे.
Water supply for farming in Nilwande resumed, providing much-needed relief to local farmers and citizens."
Water supply for farming in Nilwande resumed, providing much-needed relief to local farmers and citizens."Sakal
Updated on

अकोले : निळवंडे धरणातून सध्या १७०० क्युसेक वेगाने प्रवरा नदीत पाणी सोडले आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले असून या विसर्गामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठ्याला मदत होणार आहे. नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत १४ बंधारे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com