Villagers wait in queues as tankers arrive—105 villages now depend solely on tanker water.Sakal
अहिल्यानगर
Ahilyanaga: टँकरने ओलांडली शंभरी; ‘जलजीवन’वर प्रश्नचिन्ह, ऐन उन्हाळ्यात १०५ गावांना टँकर, पाण्यासाठी टाहाे..
जिल्ह्यातील १०५ गावे आणि ५५७ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. टँकरच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. शासकीय १६ आणि खासगी १०४ असे १२० टँकरने २ लाख ६ हजार २५९ लोकसंख्येला पाणी पुरविले जात आहे.
अहिल्यानगर : जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. तापमानाने चाळीशीने ओलांडली आहे. परिणामी पाणीपातळी खालावली आहे. बहुतांश धरणे खपाटीला गेले आहेत. सर्व जलस्त्रोत आटल्याने पाणी योजना बंद पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात टँकरची मागणी वाढत आहे. टँकरने शंभरी पार केली आहे. सुमारे एक हजार कोटींच्या खर्चाच्या जलजीवन योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

