

Farmers Await Rainfall Relief; Water Shortage Persists in 162 Villages
sakal
अहिल्यानगर: भारतीय हवामान विभागाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात २२ ते २६ जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट'' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.