Water Shortage : १३७ गावांतील ग्रामस्थांना पाणी टंचाईपासून दिलासा; नव्या उपाययोजनांना मंजुरी आवश्यक

सध्या जिल्ह्यात सर्वत्र सूर्य आग ओकत आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
Water Shortage
Water Shortagesakal

अकोला - उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळांपासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कुंभार यांनी पाणीटंचाई निवारणाच्या १५६ उपाययोजना मंजूर केल्या होत्या. त्यापैकी १४८ उपाययोजनांची कामे २९ एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण झाली आहेत, तर आठ कामे प्रगतीपथावर आहेत. दरम्यान १३७ गावातील पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना पूर्ण झाल्याने आता संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

सध्या जिल्ह्यात सर्वत्र सूर्य आग ओकत आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामीणांना उन्हाळ्यात पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई सदृश्य स्थिती असल्याचे प्रस्तावित केले हाेते. या गावांतील नागरिकांसाठी ५५० उपाययोजना सुद्धा प्रस्तावित केल्या.

प्रस्तावित उपाययोजनांपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी १४५ गावांसाठी १५६ उपयायाेजनांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यामध्ये नळ योजना विशेष दुरूस्ती, विंधन विहिर, तात्पुरत्या पूरक नळयोजना, विहिर अधिग्रहण व कुपनलिकेच्या योजनांचा समावेश आहे.

सदर योजनांना मंजुरी दिल्यानंतर काही योजना १५ एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार २९ एप्रिल अखेर १४८ उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे १३७ गावातील १३७ ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

आराखड्यावर दृष्टीक्षेप

प्रस्तावित - जिल्ह्यातील २३८ गावांसाठी ५५० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ४ कोटी ५० लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित होता.

मंजुरी - जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या उपाययोजनांपैकी १५६ उपाययोजना मंजूर करण्यात आल्या होत्या. सदर उपाययोजना १४५ गावांसाठी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी दोन कोटी ९३ लाख ८ हजार रुयपे खर्च अपेक्षित आहे.

पूर्ण - मंजुरी प्राप्त उपायोजनांपैकी १४८ उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे १३७ गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

अशी आहे स्थिती

जिल्हाधिकारी कुंभार यांनी १४५ गावांसाठी १५६ उपाययोजना मंजूर केल्या होत्या. त्यापैकी २९ एप्रिल अखेरपर्यंत १४८ उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या उपाययोजनांमुळे १३७ गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पाणी टंचाईच्या ८ उपाययोजना प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे ८ गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळेल. त्यासाठी १८ लाख ९० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com