

Akola News
esakal
अकोला: “पीक गेलं, कर्ज वाढलं… पण विम्याचे पैसे अजून आले नाहीत,” असा सवाल अकोला जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक वर्षी करतात. जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप व रब्बी हंगामात नियमित पिक विमा काढतात. शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडे प्रीमियम भरून सुद्धा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळत नाही. अनेकदा तक्रार दाखल करून ही भरपाई मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पिक विमा योजना ही फसवेगिरी असल्याचा आरोप शेतकरी करतात.