
Akola Farmers
sakal
अकोला : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अति पावसामुळे १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे संयुक्त अहवालावरून समाेर आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९२ काेटींची आवश्यकता भासणार आहे. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला आहे. हा संयुक्त अहवाल महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून तयार झाला आहे.