

Akola Agriculture News Farmers Demand Relief as Kharif Crops Suffer Amid Drought Like Conditions and Rain Deficit
esakal
-योगेश फरपट
अकोला : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात सापडलेली असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रविवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय खरीप शिवार फेरीकडे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना शिवार फेरीचे आयोजन करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.