आगर (जि.अकोला) ः खारपाण पट्ट्यात येत असलेल्या आगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावर्षी माहे ऑक्टोबरच्या शेवटी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे संकटाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट वाढले आहे. परंतु अचानक आलेल्या बोंडलीने शेतकऱ्यांचा घात केला आहे. या वर्षी शंभर टक्के शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या जातीची कपाशी पेरणी पूर्ण केली असून कपाशी पीक सुद्धा चांगल्या अवस्थेत दिसत होते. त्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी होता. कपाशी पिकाच्या पहिल्या वेचणी अगोदरच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सीतादही सुद्धा पावसातच गेल्यामुळे पहिल्या वेचणीचा भाव सुद्धा शेतकऱ्यांना कमी मिळाला. असंख्य शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर बोंडअळी ने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. सर्व परिसरात बोंडअळी आल्यावरही कृषी विभागाने मात्र शेतकऱ्यांना कुठेच मार्गदर्शन केल्याचे दिसून येत नाही. कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या शेताचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी केल्या जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.