अकोला : विधानसभा निवडणुकीच्या वेळी अकोला पश्चिमची जागा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मतदारसंघ बदलण्याच्या या निर्णयामागील गुपीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी रविवारी (ता.७) अकोला दौऱ्यात उघडले.
अकोला पश्चिम मतदारसंघातून विजय देशमुख यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने येथे आपला शक्तीपात झाला असे वाटल्याने ऐनवेळी मतदारसंघ बदलून निवडणूक लढवावी लागल्याचे पाटील यांनी सांगून त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या घडमोडींवरील पडदा उचलला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला महानगर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अकोल्यात पक्षांच्या कार्यक्रमांना दिसणारी गर्दी मधल्या काळात कमी झाल्याने त्याचा परिणाम पक्षाला मिळणाऱ्या मतांवर झाल्याची खंत व्यक्त केली.
त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेवून नव्या दमाने काम करणाऱ्या युवकांची फळी तयार करण्याची सूचना त्यांना महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना केली. मतभेद विसरून सर्वांनी सोबत बसून पक्षाती प्रश्न सोडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
त्यासोबतच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अकोला जिल्ह्यातून आलेल्या अपयशावर बोट ठेव त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या घडामोडीही उघड केल्यात. विजय देशमुख यांच्या निवडणूक न लढविण्याच्या निर्णयामुळे अकोला पश्चिममध्ये आपला शक्तीपात झाला असे समजून मतदारसंघ बदलून लढण्याचा निर्णय घेतला. पुढे काय झाले ते सर्वांनाच दिसून आले.
हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?
त्यामुळे आता मागचे विसरून पुढे गेले पाहिजे, असे सांगून त्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, माजी आमदार हरिदास भदे, पक्ष निरीक्षक प्रवीण कुटे, डॉ. आशा मिरगे, मंदाताई देशमुख, कृष्णा अंधारे, राहुल डोंगरे, महानगराध्यक्ष विजय देशमुख, कार्याध्यक्ष युसूफ अली आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?
बहुजन चेहरा देण्याचा प्रयत्न
माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, राहुल डोंगरे यांनी शरद पवार यांच्याकडून सर्व आघाड्यांवर न्याय मिळेल, असा विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या आगमणानंतर पक्षाला बहुजन चेहरा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.