
रिसोड - सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे पाणी साचल्याने तुरीचे व सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले. परिणामी खरिपाच्या सुरुवातीलाच बळीराजावर आसमानी संकट कोसळले आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
खरीपाच्या नुकत्याच पेरण्या आटोपल्या. ऐन पेरणीच्या वेळी तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. पावसाने पिच्छा सोडला नाही. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीलाच घडीचा पाऊस झाल्यामुळे तसेच सोयाबीन व तूर ही पिके कोवळी असल्यामुळे पिवळी पडली आहेत. तुरीची पिके तर पाणी साचल्यामुळे संपूर्ण जळून गेली आहेत. नदीकाठची व पाणथळ शेतातील खरिपाची पिके पाणी साचल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इतर शेतातील पिकामध्ये तनाचा व किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तण नाशकाची फवारणी करून सुद्धा सततच्या पावसामुळे काहीही परिणाम झाला नाही.
ढगाळ वातावरण असल्यामुळे किडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. एकूण क्षेत्राच्या ५०% सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नदीकाठच्या तशीच पाण्याखाली गेलेल्या व पाणथळ शेताची पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
शेताला आले तलावाचे स्वरुप
मानोरा तालुक्यातील जनुना (खुर्द) ते नायणीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम झाले आहे. रोडलगतच्या नालीचे पाणी माझ्या शेतात घुसल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले असून शेतीची पाहणी करून संबंधितानी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकरी सुभाष इंगोले यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.