

Akola News
esakal
अकोला: आधुनिक शेतीमध्ये सुधारित वाणांच्या वापरामुळे उत्पादकता वाढली असली, तरी माती आणि पाणी यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा असंतुलित वापर होत आहे. यामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचा ऱ्हास होऊन जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वापराचा अभाव आणि अन्नद्रव्यांचे असंतुलन यामुळे जमिनीची सुपीकता खालावत असल्याची धक्कादायक माहिती कृषी विद्यापिठाच्या मृद विज्ञान विभागाच्या संशोधनात समोर आली आहे.