
अकोला : बुधवारी (ता.१३) सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिपरिप सुरू राहिल्याने खरीपातील पिकांना दिलासा मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.