दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले

दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले

वाशीम ः आधीच बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमतीने शेतकरी हवालदिल झाला असताना, आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. अनियमित पावसाने पेरलेले सोयाबीन कुजले असून, कृषी विभागाने याबाबत सर्वे करून मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यामधे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता.
मानोरा व मालेगाव तालुक्यात मुसळधार, तर इतर तालुक्यात साधारण पाऊस बरसला होता. रिसोड तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. (Crisis of double sowing on farmers in Washim)

दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले
राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा

वाशीम, मालेगाव, कारंजा या तालुक्यात अपूऱ्या पावसावर पेरणी झाली. परिणामी पेरणीनंतर पाच ते सहा दिवस पाऊस न आल्याने या पेरण्या उलटल्या आहेत. मालेगाव व मानोरा तालुक्यात सुरवातीलाच मुसळधार पाऊस पडला, मात्र पेरणी केल्यानंतरही जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचे बियाणे दबले जावून उगवण झाली नाही. शिरपूर जैन परिसरातील अनेक गावात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पहिल्या पेरणीसाठी कर्ज काढून बेगमी केली असताना, दुबार पेरणीची सोय कशी करावी? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीबाबत पंचनामे करून किमान बियाण्याची मदत होईल, असे धोरण राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले
नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली


बीज प्रक्रीयेअभावी झाले नुकसान
सोयाबीन हे द्विदल तेलवाण आहे. सोयाबीनचे कवच अतिशय पातळ असते. अपूऱ्या ओलीत किंवा पाणी साचले, तर या कवचाला बुरशी धरते. या बुरशीमुळे सोयाबीनचा अंकूर सडतो परिणामी उगवण होत नाही. यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी घरची सोयाबीन बियाणे पेरले, मात्र बीज प्रक्रीया न केल्याने हे सोयाबीन पातळ उगवले आहे.

दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले
नेता असावा तर असा! वेशांतर करुन गुटखा विक्रेत्यांवर बच्चू कडूंची धाड


अपुऱ्या ओलीवर पेरणी झाली तर बियाणे उगवत नाही. आता दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. जमिनीत वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी, तसेच बीज प्रक्रीया आवश्यक असून, चांगले उगवण क्षमता असलेले बियाणे निवडावे. पेरणी करताना आधीच्या पेरणीचे खत सात ते आठ सेंटीमीटरवर दिले असेल, तर पुन्हा खते देण्याची गरज नाही. शक्यतो आधी पेरलेल्या तासाच्या बाजुला पेरणी करावी. पेरणीची वेळ अजूनही गेली नाही.
- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी.

संपादन - विवेक मेतकर

Crisis of double sowing on farmers in Washim

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com