अकोला : ‘रक्षाबंधन’ हा बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावचे हृदय प्रेमाणे जिंकून घेते. त्यानंतर भावाला ओवाळत त्याचे तोंड मिठाईने गोड करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या बाजारात विविध प्रकारच्या राख्यांसह मिठाया सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. परंतु ही मिठाई भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळाईच्या रुपाने घराघरात ‘स्वीट पॉयझन’ पोहचण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे.
राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यंदा राखी पौर्णिमा ही सोमवारी (ता. 3) साजरी केली जाणार आहे. भाऊ-बहिणीचा पवित्र नात्याला समर्पित या सणाला बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचं आणि रक्षणाचं प्रतिक अशी राखी बांधते. भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहिण मागणं मागते आणि एकमेकांना गिफ्ट देऊन सणाचा आनंद द्विगुणीत होतो.
भाऊ-बहिणीच्या पवित्र सणाला बहिण भावाचे तोंड मिठाईने गोड करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शहरातील दुकानात चमचमीत विविध प्रकारची रंग बेरंगी मिठाई उपलब्ध झाली आहे. सदर मिठाई स्वस्त असून आकर्षण पॅकिंगमध्ये असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. परंतु बाजारात असलेली ही मिठाई शुद्ध खव्यापासुनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना त्याचा दर्जा तपासूनच पाहण्याची आवश्यकता आहे.
अशी ओळखा मिठाईतील भेसळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.