कारंजा डॅममुळे तुटला चार गावांचा संपर्क

उरळ व झुरळ गावात जाण्यासाठी रस्ताच नाही; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
Karanja Dam News Updates
Karanja Dam News Updates

बाळापूर - प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण भागात आज विविध समस्या तोंड द्यावे लागत, असून गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उरळ (खु.), झुरळ (खु.) यासह चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Karanja Dam News Updates)

बाळापूर तालुक्यातील उरळ (खु.), झुरळ (खु.) या गावावर मोठे संकट उभे राहिले आहे, मात्र शासन आजही हातावर हात ठेऊन शांत बसले असल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने चांगलाच तडाखा लावला आहे. यामध्ये अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिच परिस्थिती आज बाळापूर तालुक्यात दिसत आहे. या ठिकाणी मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कारंजा डॅम पाणलोट क्षेत्रात येत असलेल्या उरळ (खु.), झुरळ (खु.), उरळ (बु.) आणि झुरळ (बु.) या चार गावांशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे.

परिसरातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण व गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या वतीने प्रस्तावित पुलाचे नवनिर्माणचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत वारंवार सांगूनही पूर्ण झाले नाही, तसेच पुलाची निर्मिती झाल्यानंतर पाणी अडवण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन दिले, मात्र याबाबत शासनाने नागरिकांच्या निवेदनाला वेळोवेळी केराची टोपली दाखवली.

परंतु, प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आहे या ठिकाणी चार गावाचा संपर्क तुटला, असून या गावाच्या ग्रामस्थांना विविध समस्यांना आज सामोरे जावे लागत आहे. निर्माण केलेल्या समस्यांमुळे जीवितहानी देखील होऊ शकते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहणार असल्याचे ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com