Dr. Mohan Bhagwat
sakal
खामगाव - समाजपरिवर्तन केवळ भाषणांनी घडत नाही, तर सकारात्मक विचार आणि प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तनाची प्रक्रिया पुढे जाते. चांगल्या कामाची कधी जाहिरात करण्याची आवश्यकता नसते; तर त्याचा परिणाम समाजात दिसतो, ते काम पुढे जाते आणि वाढत राहते. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर केवळ अपेक्षा व्यक्त न करता प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.