MLA Nitin Deshmukh
sakal
अकोला - पातूर व बाळापूर तालुक्यात ३० मार्च रोजी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग व इतर शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून पिक नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची सूचना आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पत्राद्वारे केली आहे.