

Hivarkhed Farmers' Issue
esakal
हिवरखेड: आभाळाकडे डोळे लागले आहेत, शेतात पिके उभी आहेत; मात्र पाऊस गायब झाल्याने हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या उभ्या पिकांवर संकट निर्माण झाले असून, हाती तोंडाशी आलेला घास हातातून जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पिके वाचविण्यासाठी पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी रात्रंदिवस धडपड करीत आहेत, तर कोरडवाहू शेतकऱ्यांना आभाळाकडे पाहण्याशिवाय पर्याय नाही.