Karanja Industry : औद्योगिक वसाहत केवळ नावापुरतीच; रोजगाराचा प्रश्न कायम

अनेक दशके वऱ्हाडात व्यापारनगरी म्हणून ख्याती असलेल्या कारंजात औद्योगिक विकास मात्र अजूनही बाल्यावस्थेत आहे.
Industry
IndustrySakal

कारंजा - अनेक दशके वऱ्हाडात व्यापारनगरी म्हणून ख्याती असलेल्या कारंजात औद्योगिक विकास मात्र अजूनही बाल्यावस्थेत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी जातीपातीच्या राजकारणाची बेरीज वजाबाकी करण्यात गुंग असून तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे.

वाशीम, यवतमाळ, अमरावती, अकोला या चार जिल्ह्यांच्या मध्यभागी असलेले कारंजा शहर हे अतिप्राचिन-ऐतिहासिक-आध्यात्मिक-धार्मिक व व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. "अ" श्रेणी तीर्थक्षेत्र श्री गुरुमंदिर कारंजा या संस्थानमुळे तसेच जैन धर्मीयांच्या पौराणिक तिरीथस्थळामुळे संपूर्ण जगभरातील देश विदेशाच्या यात्रेकरूची येथे बाराही महिने वर्दळ असते.

देशभरातील महत्त्वाच्या व्यक्तींचे आवागमन होत असतांनाही कारंजा नगरीचा कायापालट होऊ नये, ही दुर्दैवी बाब आहे. स्थानिक नेते पाहीजे तसे सक्रिय नसल्यामुळे शहराच्या विकास प्रलंबित आहे.

मोठया कंपनी इतर राज्यात जात आहेत. या परिसरात उद्योग उभारल्यास स्थानिक नागरिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो. कारंजा हे शहर व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजारपेठ आशीया खंडातील पहिली बाजारपेठ असल्याचाही इतिहास ऐकायला मिळतो.

चारही जिल्ह्यातून येथे शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला येत असतो. त्यामुळे ह्या शेतमालावर प्रक्रिया करणारी औद्यागिक केंद्र आणि शेतमालावर आधारीत ऑईल मिल, दाळ उद्योग व इतर उद्योग इत्यादी सुरू करता येऊ शकतात. दारव्हा (यवतमाळ) किंवा मुर्तिजापूर (अकोला) मार्गावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाल्यास फार मोठी औद्योगिक वसाहत निर्माण होऊन हजारो स्थानिक मजूरांना रोजगार मिळू शकतो. स्थानिकांच्या उच्चशिक्षणाची येथे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.

कारंजा शहराच्या सीमेवरून गेलेला नागपूर ते मुंबई स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तसेच नागपूर-औरंगाबाद मार्ग इत्यादी सुविधा कारंजा नगरीच्या विकासाला पूरक असल्यामुळे कारंजा शहराचा उद्योग उभारणी अंतर्गत विकास करता येईल काय? याचा अभ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनकर्त्यानी करून निदान आगामी सार्वत्रिक निवडणूकांना सामोरे जाण्यापूर्वी तरी एखाद्या विकास प्रकल्पाची घोषणा करून त्यावर अंमलबजावणी सुरु करावी. जेणेकरून रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल.

उद्योग उभारणी करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे गररजेचे आहे. रोजगार उपलब्ध झाल्यास शहरात फार मोठी चालना मिळेल.

- संजय कडोळे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक

समृद्धी महामार्ग हा कारंजा शहराला लागून गेला आहे. उद्योग व्यापाराकरिताच हा मार्ग बनवण्यात आला आहे. छोट्या शहरातून बनवलेला कच्चामाल मोठ्या शहरात पाठवण्याकरिता सदर महामार्ग बनवण्यात आला. जर उद्योगच नसेल तर या महामार्गाचा काय उपयोग? अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक शेतकरी, व्यावसायिक, बेरोजगार युवकांमधून येत आहे. यामुळे कारंजा शहरात उद्योग सुरू होणे गरजेचे आहे.

- देवव्रत डहाके, युवा नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com