अकोला - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंगळवारी (ता. २५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या विषयावर याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडली..दोन्ही बाजूकडील सुनावणी पार पडल्यानंतर याबाबत आता २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडता का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग ६ मे राेजी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माेकळा झाला. त्यामुळे प्रभाग रचना, आरक्षणही निश्चित झाले. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेविषयी निर्माण झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली..ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आरक्षणाची ५० टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली गेल्याचा आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी गत सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला कोणत्याही स्थितीत आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले होते..दरम्यान या प्रकरणावरील १९ व २५ नाेव्हेंबर राेजी झालेली सुनावणी २८ नोव्हेंबर होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षणाची टक्केवारी ५९ वर पाेहाेचल्याने इच्छुकांच्या नजरा न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.